राजुरा (ता.प्र) आज संपूर्ण दिवसभरात कोरोना आणि लॉकडाऊन च्या पाश्र्वभूमीवर राजुरा तालुक्यात विविध स्तरांवर प्रशासकीय दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे. शहरातील दैनंदिन भाजी बाजारात लॉकडाऊन च्या काळातही मोठी गर्दी होत असल्याने लॉकडाऊनच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासले जाताना दिसत होते. शेवटी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी आर्शीया जुही आणि तहसीलदार डॉ. रवींद्रहोळी यांच्या नियोजनात सकारात्मक निर्णय […]
Author: Maha Vidarbha
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानदारावर कारवाई
गडचांदूर (ता.प्र.)कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिल पावेतो संचारबंदी लागू केली आहेत. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानदारावर गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी भादंवि १८८ नुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली. यामध्ये गडचांदूर व नांदा फाटा येथील दुकानदाराचा सामावेश आहे. विनाकारण मोटारसायकलवर फिरणाèया वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. संचारबंदी […]
मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे दुःखद निधन
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर येथील प्रतिष्ठीत नागरिक स्व. श्री. गोविंदराव नालमवार यांच्या पत्नी मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे वृध्दापकाळाने आज दि. २६ मार्च २०२० रोजी दुपारी १ वा. दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांंये वय ८५ वर्ष होते. त्या न्यु भारत तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका होत्या. त्या अंतर्गत त्या स्लम एरियात बालवाडी व पाळणाघर चालवित होत्या. व आपल्या परिने […]
शहरातील वस्त्यांमध्ये जमा होतात नागरिकांचे घोळके
चंद्रपूर (का.प्र.)कोेरोना या जिवघेण्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन केले. देशातील जनतेला घरातून बाहेर न निघण्याचे हात जोडून विनंती सुध्दा केली. मात्र अजूनही कित्येक परिसरातील जनतेच्या डोक्याच्या वरून गेल्यासारखे मुख्य रस्ते वगळता शहरातील वस्त्यांमध्ये चौकात नागरिकांचे घोळके बघायला मिळत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. चंद्रपुरात अजुन एकही […]
करोनाग्रस्तांसाठी सिंधूने राज्य सरकारला दिले १० लाख!
हैदराबाद (मवृसे)गेल्या काही दिवासांपासून भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाची लागण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करणारी भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने राज्य सरकारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे.सिंधूने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची […]
कोरोनामुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत
राजुरा (ता.प्र.)गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मराठी नववर्ष म्हणून हा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूत येणारा गुढीपाडवा निसरगीत नवचैतन्याची ऊर्जा निर्माण करतो. पानझडीनंतर बहरलेली हिरवी पालवी जणुकाही नव्या उमेदीने जगायला शिकविते. कोरोनाच्या दहशतीत आपला देश लॉकडाऊनफ केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष साजरा करताना गृहिणीनी नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर कोरोना हद्दपार करण्याचा संकल्प सोडला आहे. कोरोणा मुक्तीच्या […]
आवळगावकऱ्यांनी केली बाहेरच्यांना प्रवेश बंदी
आवळगाव (प्रति)पूर्वी व हल्ली खेडेगावात धाना वरती निसर्गाच्या कोपाने अळी पडल्यास गावातील गावकरी अळी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेऊन अळीचा समूळ नायनाट करण्यासाठी रातभर जागरण भजन कीर्तन करुन गावा सभोवतालच्या सीमा बंद करून अळीबांधण्याचा कार्यक्रम करीत असत. हा परंपरेनुसार चालत आलेला समज होता. आता या विज्ञान युगात संसर्गजन्य रोग हा देवाचा नाही हे कोरोना या साथीच्या […]
विदर्भाला वादळी पावसाने झोडप
नागपूर (मवृसे)करोनामुळे धास्तावलेल्या विदर्भवासीयांपुढे आता पुढील काही दिवस वादळी पावसाचेही आव्हान आहे. बुधवारी मध्यरात्री दरम्यान विदर्भात नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपीटसुद्धा झाली आहे. यामुळे पीकांचेही नुकसान झाले आहे. सोमवारपर्यंत विदर्भात ही परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांनी पुढील काही दिवस आपल्या प्रकृतीची अधिक काळजी आवश्यक आहे. करोना व्हायरसचा […]
अत्यावश्यक खरेदीवेळी सामाजिक अंतराची गरज
गडचिरोली (प्रति)शहरातील नागरिक अत्त्यावश्यक साहित्य खरेदीसाठी एकाच वेळेला गर्दी करीत असल्याने किराणा, मेडिकल व भाजीपाला खरेदी करतांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी चौकटी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने भाजीपाला, मेडिकल व किराणा साहित्य खरेदीसाठी […]
सार्ड संस्थेकडून इंडियन आऊल या पक्षास जीवदान
चंद्रपूर (का.प्र) आज विलोडा या गावी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भिमराज बागेसर यांचे घरी झाडावर जखमी अवस्थेत घुबड आढळला. त्याला २० ते २५ कावळ्यांनी घेरले व टोचून मारायला लागले.घरच्या व्यक्तींनी कावळ्यांना हाकलून लावले. परन्तु तेव्हाच घुबड झाडावरून खाली पडले. त्यानंतर ही माहिती सार्ड संस्थेचे सदस्य व वनविभाग यांना देण्यात आली. यांना माहिती मिळताच सार्डचे […]










