चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. तोहोगांव येथे वास्तव्य करत असलेले दिनकर ठेंगरें हे नेहमीच शेतात जात असे. त्याचे शेत जंगलाला लागलेले आहे. काल दि. 27/06/2020 रोज शनिवारला नेहमी प्रमाणे शेतात गेले. सायंकाळ झाली तरी मात्र ते परत आलेच नाही. मग घरच्यांनी दिनकर चा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र कुठच त्यांचा पत्ता लागत नव्हता. आज सकाळी 8 वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात सापडला असून त्याचा शरीरावर वाघाचे हल्ले दिसून आले. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन व वन अधिकाऱ्याला फोन करून कळविले. ही घटना घडताच गावा लगत परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
Related Articles
शेतीविकास व ओबीसी विकास साधणारा अर्थसंकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
ओबिसींसाठी दहा लाख घरे बांधून देणार असल्याच्या घोषणेचे स्वागत चंद्रपूर : शिंदे फडणविस राज्य सरकारने आज (दि.९) ला सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे. शेती, मुली व महिला, अंगणवाडी सेविका, असंघटीत कामगार, आरोग्य क्षेत्र, ज्येष्ठ नागरीक, आदिवासी, ओबीसी, तथा नदीजोड, सिंचन, रस्ते आदी भौतिक सुविधांसाठी भरीव योजनांचा विचार […]
मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वनमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणेबाबत व मेंढपाळांच्या इतर समस्यांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी – मा.ना. सुधीर मुनगंटीवार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील तत्त्वज्ञानी महाराणी होत्या. त्यांनी बुध्दीचातुर्याच्या बळावर लोकाभिमूख कार्य करुन जनतेच्या कल्याणाकरिता कृतीशिल कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरल्या गेले आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता, शेतकरी, शेतमजूर यांचेकरिता उपयुक्त कार्य यासारख्या अनेक सामाजिक सुधारणा करुन लोककल्याणकारी कार्य केले […]



