
यवतमाळ (मवृसे)करोनाच्या प्रकोपामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीवर बंदी असतानाही तेलंगण-महाराष्ट्र सीमेवर कंटेनर व टड्ढकमधून लपून प्रवास करणाèया १५० जणांना यवतमाळ पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग सातवर तेलंगण- महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेकपोस्टवर गुरुवारी तपासणी सुरू असताना संशय आल्याने यवतमाळ पोलिसांनी एका कंटेनरची व टड्ढकची तपासणी केली. यामध्ये जनावरांसारखे कोंबलेले १५०च्या जवळपास कामगार आढळून आले. यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणच्या अदिलाबाद जिल्ह्यातील हे कामगार असून ते सर्व राजस्थानमधील आहेत. कामासाठी ते आदिलाबादमध्ये आले होते देशात सर्वत्र करोनामुळे कामे बंद पडली आहेत.
रेल्वे, बस वाहतूक बंद असल्याने हे कामगार अदिलाबाद जिल्ह्यात अडकून पडले होते. जीव धोक्यात घालून कंटेनर व टड्ढकने राजस्थानमधील आपल्या गावी जाण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी कंटेनरच्या चालकाने त्यांच्याकडून मोठा मोबदला वसूल केला. अत्यावश्यक सामानाची वाहतूक करीत असल्याचे भासवून त्यांना बाहेर नेण्याचा चालकाचा प्रयत्न पोलिसांच्या खबरदारीने यशस्वी होऊ शकला नाही. एका कंटेनरमध्ये ७० ते ८० व टड्ढकमध्ये ६० ते ७० कामगार होते. कंटेनरचा दरवाजा बाहेरून कुलूपबंद करण्यात आला होता. सामानाऐवजी माणसे कोंबली आहेत हे बाहेरून लक्षात येत नव्हते. गुरुवारी सकाळी कंटेनर व टड्ढक अदिलाबादवरून निघाले. दहाच्या दरम्यान पिंपळखुटी चेकपोस्टवर पोहोचले. त्याठिकाणी कामावर असलेले पोलिस उपनिरीक्षक रंगलाल पवार याना संशय आल्याने त्यांनी कंटेनरचे कुलूप उघडण्यास सांगितले.
चालकाने कुलूप उघडताच त्यामध्ये जनावरांप्रमाणे माणसे कोंबलेली आढळून आली. टड्ढकमध्येही मोठ्या संख्येने माणसे आढळली. पवार यांनी तातडीने पांढरकवड्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे याना माहिती दिली. कामगारांना खाली उतरविण्यात आले. त्यावेळेस ते पायीच पांढरकवड्याकडे निघाले. तहसीलदारांनी घटनास्थळ गाठून त्यांना माघारी जाण्यास सांगितले, पण त्यांनी काहीही ऐकण्यास नकार दिल्याने शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व कामगारांना कंटेनर व टड्ढक मध्ये बसवून तेलंगणच्या सीमेवर सोडले. सीमेवरील पोलिसांना त्यांची माहिती दिली व ते ज्या गावातून आले होते तेथे पोहचविण्यास सांगितले.



