चंद्रपूर (का . प्र ): लॉकडाउन २ दि . ३ रोजी संपल्यानंतर जिल्लाधिकाराच्या सूचनांनुसार विद्यार्थी व मजुरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे विद्यार्थी व मजुरांची ई पास व मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात उडाली होती हे विद्यार्थी व मजूर आपआपल्या टू व्हीलरनेच गावाकडे जायला निघाले होते तत्पूर्वी मेडिकल तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात आज ७०० जणांनी तपासणी केली व जाण्यास तयार झाले लॉकडाउनमुळे अडकल्यामुळे विद्यार्थी व मजूर घरापासून दूर राहत असल्यामुळे आज ते घरी जाण्यास आतुर झाले होते तरी प्रशासनाने काही गरजवंतांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली होती . पण बेरोजगारीमुळे मजूर चिंतीत झाले होते. व गावाकडे जाण्यास उत्सुक होते त्यामुळेच मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात झाली होती
Related Articles
विदर्भातील ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई येथ्ील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत 14 रोजी दुपारी 1 वाजता ज्येष्ठ ओबीसी व विदर्भवादी नेते डाॅ.अशोक जीवतोडे यांचा शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काॅंग्रसे मध्ये प्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते जयंत पाटील, प्रफुल पटेल, श्रीमती सुप्रिया सुळे उपस्थित हेते. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षणसंस्था […]
कोर्टीमक्ता येथील मृतक सचिन गायकवाड यांच्या कुटूंबियांना आ. मुनगंटीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत
मुख्यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करणार. बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड या २४ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यु झाला. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार भाजपा पदाधिका-यांनी शोकाकुल कुटूंबियांची भेट घेत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन लवकरच २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य संबंधित कुटूंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन भाजपा […]
*जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर, पेपर अशा प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे – हंसराज अहीर*
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिमेंट, पॉवर, स्टील, मॅगनीज व अन्य वस्तू उत्पादन कंपन्या वास्तव्यास आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने या सगड्या उद्योगाने आपआपल्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. जनतेच्या सहकार्याने आणि शांततेच्या वातावरणात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कोरोना संकटात जिल्ह्यातील संपूर्ण उद्योगांना आपल्या सेवेच्या भूमिकेत एक पाऊल पुढे टाकून कार्य हाती घेण्याचे आवाहन केले […]



