चंद्रपूर दि.२४ जुलै : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हयातील रहिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचे काल रात्री उशिरा ( २४ जुलैला पहाटे २.३० वाजता ) निधन झाले. या महिलेला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खाजगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते. ही महिला तेलंगणाची मूळनिवासी असल्यामुळे या महिलेचा मृत्यूची नोंद चंद्रपूर येथील कोरोना बाधित म्हणून होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोट मध्ये सदर महिला ही तेलंगाना राज्यातून २१ जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. २१ जुलै रोजी दाखल केलेल्या महिलेला श्वसनासंदर्भातील समस्या होती. तसेच ही महिला उच्चरक्तदाबाची देखील रुग्ण होती. खाजगी रुग्णालयात असताना या महिलेचा स्वॅब २२ जुलै रोजी घेण्यात आला. या नमुन्यांचा अहवाल २३ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. २३ जुलैच्या रात्री १२.५०च्या सुमारास ( २४ जुलैला )या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र २४ जुलैच्या पहाटे २.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. सदर महिला रुग्ण यांचा मूळ पत्ता तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित म्हणून होणार नाही असे स्पष्टीकरण डॉ. भास्कर सोनारकर यांनी आपल्या अधिकृत प्रेसनोट मध्ये स्पष्ट केले आहे.त्यांच्या मृत्यूची नोंद आदिलाबाद तेलंगणा येथे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Related Articles
अखेर त्या 13 विद्यार्थ्यांना शाळेने परत घेतले – नारायणा विद्यालयम् प्रशासन नरमले त्या विद्यार्थ्यांना चालु सत्रात मिळणार मोफत शिक्षण – पालकांनी शाळेत जाण्यास मज्जाव
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र चोरडिया चंद्रपूर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही ह्या कारणास्तव चंद्रपूर येथिल नामांकित नारायणा विद्यालयम् ने तेरा (१३) विद्यार्थ्यांना पालकांशी कुठलीही चर्चा न करता त्याचप्रमाणे शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याचे उल्लंघन करून शाळेतून काढुन टाकले व त्यांच्या टी सी थेट रजिस्टर्ड पोस्टाने घरी पाठविण्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. चांदा ब्लास्ट ने त्या […]
अफवांवर विश्वास ठेवू नका -पोलीस अधीक्षक
गडचांदूर येथून पोलिसांनी नांदेड येथील ३ नागरिकांना ताब्यात घेतले असून या नागरिकांना अद्याप झाल्याचे कळाले नाही . त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांनी कळवले आहे.
*सामाजिक कार्यात “संकल्प” संस्था अग्रेसर*
संकल्प संस्था चंद्रपूरच्या परिसरात आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न. चंद्रपूर – “संकल्प” संस्था चंद्रपूर येथे मा. आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते दिनांक १९ मे रोजी इंदिरानगर, मुल रोड येथील […]


