चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
Related Articles
शिवणी – चिमुर मार्गावर जिप्सी अपघात, एक ठार तीन जखमी
चंद्रपुर :- सिन्देवाही तालुक्यातील शिवणी – चिमुर मार्गावरील शिरकाळा गावाजवळ जिप्सी चालकाचा वाहना वरून नियत्रंन सुटल्याने जिप्सी पलटून अपघात झाला. यात एका युवतीचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. शिवनी येथे आठवळी बाजार असल्याने बाजारात खरेदी करण्याकरीता शिरकाळा येथिल गावकरी बाजारात गेले होते, बाजारात खरेदी पूर्ण झाल्याने ते शिरकाळा येथे जाण्यास निघाले असता त्याना […]
पडोली मार्गावर भीषण अपघात….
चंद्रपूर/पडोली – शहरात दुपारच्या सुमारास पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुटाळा गावाजवळ भीषण अपघाताने संपूर्ण पडोली परिसर हादरून गेला. भीषण अपघातात गर्भवती महिला व 3 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. 27 वर्षीय नम्रता निखिल टावरी ही आपल्या पतीसोबत दवाखान्यात तपासणी करण्यासाठी निघाले त्यांच्या सोबत 5 वर्षीय मुलगी कनक टावरी व 3 वर्षीय लक्ष हे […]
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी सर्वोत्तम योजनांची अंमलबजावणी करा – ना. सुधीर मुनगंटीवार
प्रदुषण नियंत्रणासाठी मास्टर प्लान बनविण्याचे निर्देश चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज यांचा समावेश आहे. शहर परिसरात उद्योगांमुळे वायु, जल प्रदुषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदुषण नियंत्रणासाठी जगात असलेल्या चांगल्यात चांगल्या कार्यपद्धती अंमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई येथील बैठकीत […]



