चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
Related Articles
२५ लक्ष ७७ हजारच्या मुद्देमालासह २ आरोपीना अटक
चंद्रपूर (का.प्र.): रामनगर पोलीसानी अवैध रेती तस्करी विरुद्ध कार्यवाहीत २५ लक्ष ७७ हजारच्या मुद्देमालासह २ आरोपीना अटक केली आहे. दिनांक २०/०६/२०२० रोजी रामनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा अजयपुर जवळ अंधारी नदी शेजारील शेतात एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने रेती उचलुन हायवा ट्रक द्वारा चोरून नेत आहे. अशा माहितीवरून रामनगर पोलीसांनी तलाठी कर्मचारी यांचेसह […]
सिध्दबली व्यवस्थापनाने पूर्व कामगारांचा सहा वर्षांचा थकीत वेतन 50 टक्के गृहीत धरुन संपूर्ण अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश
चंद्रपूर : सिध्दबली पूर्व कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी व पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिध्दबली व्यवस्थापनासोबत दि. 21 रोजी पार पडलेल्या बैठकीत पूर्व कामगारांना पुर्ववत कामांवर सामावून घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 22 सप्टेंबरपासून सहा. कामगार आयुक्तांकडे आवेदन सादर करण्याची सुचना कामगारांना केली आहे. याबरोबरच सिध्दबली व्यवस्थापनाने पूर्व कामगारांचा सहा वर्षांचा थकीत वेतन […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०६ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१७४८४ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१४८५० *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२३६७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२६७ जिल्ह्यातील (२५०)बाहेरील (१७) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी […]


