चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
Related Articles
11 मार्चपासून चंद्रपुरात 35वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन
राज्यभरातून येणार पक्षिमित्रांची मांदियाळी* *वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती* *जिल्ह्यातील ‘माळढोक’ व ‘सारस’ पक्षी संरक्षण व संवर्धनावर होणार चर्चा* चंद्रपूर: यंदा 35वे पक्षिमीत्र संमेलनाचे आयोजन चंद्रपूर शहरात येत्या 11 व 12 मार्च रोजी वन अकादमी परिसरातील ‘प्रभा’ हॉल मध्ये केले आहे. या संमेलनाचे उदघाटन राज्याचे वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. यावेळी पक्षी छायाचित्र […]
कोर्टीमक्ता येथील मृतक सचिन गायकवाड यांच्या कुटूंबियांना आ. मुनगंटीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत
मुख्यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करणार. बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड या २४ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यु झाला. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार भाजपा पदाधिका-यांनी शोकाकुल कुटूंबियांची भेट घेत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन लवकरच २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य संबंधित कुटूंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन भाजपा […]
ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारांना जात वैधता पडताळणीबाबत सूचना
चंद्रपूर,दि. 16 डिसेबर: ग्रामपंचातीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारास आवाहन करण्यात येते की, दि. 1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे. जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यक दस्ताऐवजसह अपलोड केल्यानंतर ऑनलाईन […]


