चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
Related Articles
असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा – खास. बाळू धानोरकर
– कुठल्याही जाती-धर्माच्या आणि समाजावर बोट न दाखवता माणसात असलेले अवगुण, वाईट गुण दूर सारून असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा होय, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. सार्वजनिक राष्ट्रीय शारदा महोत्सव मंडळ येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी महापौर संगीता अमृतकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, प्राध्यापक शाम धोपटे, यांची […]
*जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर, पेपर अशा प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे – हंसराज अहीर*
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिमेंट, पॉवर, स्टील, मॅगनीज व अन्य वस्तू उत्पादन कंपन्या वास्तव्यास आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने या सगड्या उद्योगाने आपआपल्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. जनतेच्या सहकार्याने आणि शांततेच्या वातावरणात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कोरोना संकटात जिल्ह्यातील संपूर्ण उद्योगांना आपल्या सेवेच्या भूमिकेत एक पाऊल पुढे टाकून कार्य हाती घेण्याचे आवाहन केले […]
मुंबई -पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांनी शकुंतला लॉनवर प्राथमिक तपासणी करावी : मोहिते
Ø प्रत्येक तालुक्याला बसस्थानकावर व गावात आशा वर्कर मार्फत तपासणी Ø चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 1 हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी चंद्रपूर, दि.18 मे : चंद्रपूर शहरात मुंबई-पुणे व अन्य शहरातून आगमन होत असलेल्या नागरिकांनी आपली सर्व प्रथम तपासणी व नोंद शकुंतला लॉन येथे करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अन्य शहरात […]


