चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
Related Articles
रामसेतू हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
केबलस्टे पुलावरील विद्युत रोषणाईचे लोकार्पण चंद्रपूर : भारत माता की जय… वंदे मातरम… जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणांनी दाताळा मार्गावरील रामसेतूचा परिसर अक्षरशः दुमदुमला, निमित्त होते इरई नदीवरील रामसेतू या केबलस्टे पुलावर विद्युत रोषणाईच्या लोकार्पणाचे. बुधवार (दि.5 जुलै) संध्याकाळ चंद्रपूरकरांसाठी अनेक कारणांनी अविस्मरणीय ठरली. राज्याचे सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार […]
राजुरा येथील घटनेतील दोषींना तात्काळ अटक करा -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचेही निर्देश चंद्रपूर – राजुरा येथील सौ. पुर्वशा सचिन डोहे यांची रविवारी (२३जुलै) काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे अश्या गुन्हेगारांना ताबडतोब अटक करण्याचे व कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री. […]
घरफोडी करणारे पोलिसांच्या ताब्यात
शास्त्री नगर परिसरातील हिरेंद्र अपार्टमेंट मध्ये राहणारे निखिल पुराणिक हे दिनांक 24 मे 2023 रोजी नागपूरला मुक्कामी गेले असता दिनांक 26 मे रोजी मोलकरीण यांनी घराचा दरवाजा तोडून असल्याची माहिती फोनद्वारे कळवली त्यानंतर चंद्रपूर परत येऊन बघितले असता घरातील लोखंडी अलमारीचा दरवाजा तोडून त्यातील सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात […]



