राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या करोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे करोना रुग्णांचा आकडा ४१६वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.




