चंद्रपूर (का . प्र ) चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज दि. २६ मे रोजी राजुरा येथील भारत चौकात राहणारा शफिक शेख इमाम या २७ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. स्थानिक भारत चौक येथील रहिवाशी शफिक शेख इमाम वय २७ या युवकाचा उष्माघाताने दूर्देवी मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून राजुरा भागात भीषण उन्हाचा तडाखा नागरिकांना बसत आहे. येथील तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्याची माहिती आहे. शफिक हा गरीब कुटुंबातील युवक येथील एका दुकानात काम करतो. हा युवक उन्हात फिरल्यानंतर त्याची प्रकृति बिघडली . त्याला दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असून ४६ ते ४७ डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काळ पासून नवतपा सुरु झाला आहे. तरी नागरिकांनी उन्हात कमीत-कमी निघावे. व उष्णेपासून स्वतः बचाव करावा
Related Articles
ग्रामगीता म्हणजे ग्रामसंस्कृती आणि ग्रामविकासाचे नितळ रूप – आ. किशोर जोरगेवार
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 114 व्या जयंती तथा ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन गावांना केंद्रबिंदू ठेवून गाव कसा असावा, गावातील लोकांचे वर्तन, आचरण कसे असावे गावपुढारी, समाजसेवक कसा असावा, हे ग्रामगीतेतुन राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामविकास कसा घडवता येईल, गावातील तरुणांनी यासाठी कसे प्रयत्नशील राहावे हे विचार अगदी सरळ भाषेत ग्रामगीतेमध्ये त्यांनी मांडले असुन ग्रामगीता […]
बरांज (मोकासा) कोळसा खान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा-लोकसभेत नियम ३७७ अन्वये खासदार बाळू धानोरकर यांची मागणी
चंद्रपूर – भद्रावती तालुक्यात बरांज (मोकासा) कोळसा खाण पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करून ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी लोकसभेत नियम ३७७ अन्वये खासदार बाळू धानोरकर यांनी केली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भद्रावती तालुक्यात 2003 च्या कोळसा खाण वाटपात बरांज कोळसा खाण कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला कोळसा मंत्रालयाने दिली होती. ही खाण प्रत्यक्षात […]



