चंद्रपुर जिल्हा

उष्माघाताने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

चंद्रपूर (का . प्र ) चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज दि. २६ मे रोजी राजुरा येथील भारत चौकात राहणारा शफिक शेख इमाम या २७ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. स्थानिक भारत चौक येथील रहिवाशी शफिक शेख इमाम वय २७ या युवकाचा उष्माघाताने दूर्देवी मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून राजुरा भागात भीषण उन्हाचा तडाखा नागरिकांना बसत आहे. येथील तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्याची माहिती आहे. शफिक हा गरीब कुटुंबातील युवक येथील एका दुकानात काम करतो. हा युवक उन्हात फिरल्यानंतर त्याची प्रकृति बिघडली . त्याला दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असून ४६ ते ४७ डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काळ पासून नवतपा सुरु झाला आहे. तरी नागरिकांनी उन्हात कमीत-कमी निघावे. व उष्णेपासून स्वतः बचाव करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *