चंद्रपूर (का.प्र) महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते परंतु काही कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते टोकन पद्धतीशिवाय कापूस खरेदी केला जात नव्हता टोकन करिता अडवणूक करून पैसे वसुलीचा आरोप होत होता काही ठिकाणी अडत्यांचा कापूस खरेदीला प्राधान्य दिले जात होते प्रत्येक गाडीमागे ग्रेडर पैशाची मागणी करीत होते आज जवळपास ७० गाडी कापूस शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणला असता खरेदी बंद असल्याच्या सुचना देण्यात आल्या जीव घेण्यात उन्हात शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होत होत्या बाजार समितीची अडवणूक कूपन प्रणाली यामुळे शेतकर्यांचा संयम सुटल्याने युवा शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता चंद्रपूर आदिलाबाद राज्यमार्ग रोखून धरून चक्काजाम आंदोलन सुरू केले दोन तास शेतकरी उन्हात आंदोलन करीत होता अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर विलास यामावर यांनी आंदोलना स्थळ गाठून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या दबावाखाली टोकण पद्धती बाजूला ठेवून आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहेत सीसीआय द्वारे तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
Related Articles
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ऑटोरिक्षा चालकांना नविन खाकी ड्रेसचे वितरण
महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघटनेच्यावतीने १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापणदीनानिमित्याचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील ऑटोरिक्षा चालकांमध्ये शिस्थीचे स्वरुप निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहरातील ऑटोरिक्षा चालकास नविन खाकी ड्रेसचे वाटप दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३.०० वा. ना. मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे वितरीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य […]
बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागातील फेरफार प्रक्रिया सुरळीत करा:- राजु झोडे
फेरफार बाबतची किचकट प्रक्रिया थांबवून जनतेला नाहक त्रास देणे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन वंचितचा इशारा बल्लारपूर:- बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागाने सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्यासाठी फेरफार करताना न्यायालयीन वारसान प्रमाणपत्र आणण्याचे सांगितले जात आहे. पूर्वी शपथपत्रावर फेरफार केल्या जात होते. परंतु आता नगरपालिकेने जाचक अट दिल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. […]
मनपा आयुक्त डॉ पालीवाल सोबत इंजि . हजारे यांनी भिवापूर प्रभाग मध्ये केली रस्त्याची पाहणी
भिवापूर प्रभाग मध्ये माननीय आयुक्त डॉ.विपिनजी पालीवाल साहेब यांच्या सोबत झोन इंजिनियर रवींद्र हजारे यांनी दिनांक १५/०३/२०२३ ला सकाळी १०:३० वाजता राजीव गांधी इंजिनियर कॉलेज समोर बेणार बगीच्या मध्ये आणि बेनार स्टेशन समोरील माता नगर चौक पठाणपुरा गेट जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली त्यावेळेस महाकाली प्रभागाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर भिवापूर प्रभागाचे माजी नगरसेवक वसंतराव देशमुख […]



