पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम सर्वांंना पाळायचे आहेत. या काळात रेल्वे आणि विमान सेवा सुरू होणार नाही, असे सांगतानाच सर्वांना लॉकडाऊनचे नियम पाळायचेच आहे. घरातच सर्वांना थांबायचे आहे. गरज असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडा. आपल्याला करोना विरोधात लढायचे आहे आणि हे युद्ध जिंकायचेच आहे, असेही त्यांनी सांगितले.




