राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बुं. येथे दिनांक ७ आॅक्टोबर २०२० ला सकाळी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या उपसरपंच मारोती नेव्हारे व दादांजी घोडमारे यांच्यावर जगली डुक्कराने हल्ला केला यात हे दोघेही जखमी झाले असून दोघांवरही वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात वाघाची दहशत पसरली असून सोमवारी खांबाळा बिटात वाघाने मारोती पेंदाम या शेतकऱ्याचा बळी घेत परिसरातील दहावा मानव बळी घेतला आहे. या वाघाने आतापर्यंत अनेक प्राण्यांचा फडशा पाडला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून वाघाला जेरबंद करण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यातच आता जंगली डुक्कराच्या हल्ल्यातून मानव प्राण्यांना संरक्षण देण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान या नरभक्षक वाघा बरोबरच जंगली डुक्कराचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Related Articles
दारू दुकानांकडून नियमांचे उल्लंघन
जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची कारवाईची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर : राज्य शासनाने परवाने मंजूर करताना दारू दुकानांसाठी नियमावली निर्धारित करून दिली आहे. परंतु, शहरातील अनेक दारू दुकानदारांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. मात्र, राज्य उत्पादन शूल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी केवळ अर्थपूर्ण मैत्री जपण्यात धन्यता मानताना दिसत आहे. त्यामुळे […]
चंद्रपुरात उत्साहात साजरा झाला गणपती विसर्जन सोहळा…
एकूण ८३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन, पहाटे ६ पूर्वी रस्ते स्वच्छ. चंद्रपूर १० सप्टेंबर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. मोठ्या १०९ मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. […]
घरोघरी-गावोगावी सर्व ओबीसींनी संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
चंद्रपूर : ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी भारतीय संविधानात ३४० वे पहिले कलम ओबीसींसाठी नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संविधानानेच ओबीसींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आजतागायत ओबीसींना त्यांचे हक्क व अधिकार कोणत्याच राज्यकर्त्यांनी मिळू दिले नाही व त्यासाठीच मागील कित्येक दशकापासून ओबीसींचा लढा सुरू आहे. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जिवन […]



