चंद्रपुर

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची वीजनिर्मिती ठप्प

चंद्रपूर (का.प्र.)करोनामुळे विजेची मागणी घटल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे सातही संच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातील वीजनिर्मिती सोमवारी पूर्णपणे ठप्प झाली. सध्या लॉकडाउनमुळे विजेची मागणी घटली. उद्योगधंदे बंद असतानाच पावसाने हजेरी लावल्याने विजेच्या मागणीत मोठी घट झाली. एप्रिल महिन्यात सुमारे २० ते २२ हजार मेगावॅटची मागणी राज्यात असते. ती आता केवळ १२ हजार मेगावॅटवर आली आहे.

त्यामुळे महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रासह परळी, भुसावळ, नाशिक येथील सर्व संच बंद पडले आहेत. तर कोराडी, खापरखेडा व पारस या तीन वीजनिर्मिती केंद्रातून सुमारे तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून ५०० मेगावॅटचे दोन संच सुरू होते. सोमवारी सायंकाळी विजेची मागणीच नसल्याने हे संचही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत संचांच्या देखभालीची कामे केली जाणार असल्याची सूत्रांनी दिली. तर विजेची मागणी वाढताच टप्प्याटप्प्याने संच सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वी पाण्याअभावी २०१०मध्ये वीज संच बंद झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.