चंद्रपूर(का.प्र.) :येथील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लॉकडाऊन पासून पयर्टन बंद होते. अखेर आज तीन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर आज १ जुलै पासून व्याघ्र पर्यटनास सुरवात करण्यात आली आहे. आज सकाळी आगरझरी व कोलारा येथून ५ जिप्सी पर्यटकांना घेऊन व्याघ्र भ्रमंतीसाठी जंगलात रवाना करण्यात आल्या. त्यापूर्वी संपूर्ण जिप्सी वाहनावर सॅनिटायजर फवारण्यात आले व सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.
Related Articles
वाघाचा हल्ल्यात एक ठार कुटुंबीयास वनविभागाची २५ हजार रूपयाची तातडीची मदत
: संजय पडोळे, प्रतिनिधी नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडण्यास गेलेल्या मारोडा येथील मनोहर आडकुजी प्रधाने याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे […]
बल्लारपूर खूण प्रकरणातील सर्वा आरोपी अटकेत
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका ३२ वर्षीय तरुणाचा खून करून मारेगावमार्गे पळून जात असताना मारेकऱ्यांच्या वाहनाला मारेगाव येथे अपघात झाला. त्यामुळे खून प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही घटना मंगळवारी घडली. बल्लारपूर येथील मृतक मिलिंद बोंदाळे ( ३२ ), सलमान मजिद खान पठाण ( २४ ) व गणेश नरेश […]
ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार
पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण चंद्रपूर : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे घड्याळाकडे पाहून काम करू नका तर गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांनी तन-मनाने काम करावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त […]


