चंद्रपुर जिल्हा

मांगलीजवळ अपघातात तिघांचा मृत्यू

वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) चंद्रपूर हे तिघे जण चंद्रपूरचे होते. मांगली गावाजवळ ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अचानक निघाले त्यामुळे कार वेगाने असल्यामुळे समोरच्या झाडावर आदळली त्यात दोघांचा जागीच व एकाच वरोरा ग्रामीण रुग्णालयात नेतांना वाटेत मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.