वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) चंद्रपूर हे तिघे जण चंद्रपूरचे होते. मांगली गावाजवळ ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अचानक निघाले त्यामुळे कार वेगाने असल्यामुळे समोरच्या झाडावर आदळली त्यात दोघांचा जागीच व एकाच वरोरा ग्रामीण रुग्णालयात नेतांना वाटेत मृत्यू झाला.
Related Articles
सिध्दबली ईस्पातच्या पूर्व कामगारांना रोजगार व थकीत वेतन तातडीने निर्गमित करा – हंसराज अहीर
चंद्रपूऱ- सिध्दबली ईस्पात लिमी. कंपनी, आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) विसापूर प्रस्तावीत कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक पडोली शिवाजी […]
आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 13 सप्टेंबर : जिल्ह्यात सोमवारी (दि.13) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 688 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 115 […]
‘‘हर घर तिरंगा’’ हा कार्यक्रम राबविणे हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण – आ. मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे घेतला कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन हर घर तिरंगा ही योजना संपूर्ण देशभर राबविण्याचे ठरले आहे. ही योजना चंद्रपूर जिल्हयात सुध्दा पूर्ण शक्तीने यशस्वी करावयाची आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बल्लारपूर येथे घेतलेल्या बैठकीत बोलताना केल. यावेळी आ. मुनगंटीवार […]



