वैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठवा – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रकल्पग्रस्त शेतकरी हा प्रत्येक प्रकल्पाच्या उभारणीसह यशस्वीततेसाठी महत्वाचा कणा असतांना त्यांना दुर्लक्षित करून प्रकल्प चालविणे हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय असल्याने सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात सन्मानजनक रोजगार व रास्त मोबदला मिळणे हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे. असे असतांना वेकोलि च्या माध्यमातून काही प्रकल्पग्रस्तांना वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्यात आले परंतु या सर्व प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यात यावे अशा सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे यांना बैठकीच्या माध्यमातून केल्या. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीला क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे, कार्मिक विभागाचे श्री मनोगरन व प्रकल्पग्रस्तांमध्ये विशाल मिलमिले, धनराज पिंपळशेंडे, अक्षय बल्की, निलेश घुगरूळ, मनोज खाडे, ऋषी रासेकर, स्वप्नील वासेकर, आशिष ठेंगणे, दिवेश देठे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सदर बैठकी दरम्यान हंसराज अहीर यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या विषयाला अनुसरून न्याय मिळावा याकरिता महाप्रबंधक कार्यालयातून त्वरित सकारात्मक प्रस्ताव कोल इंडिया च्या मुख्यालयात सादर करण्याच्या सूचनाही केल्या. अनेक प्रकल्पग्रस्त आजही आपल्या रोजगार व मोबदल्याची प्रयत्नरत असतांना त्यांना शुल्लक कारणास्तव वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्याचा प्रपंच हा चुकीचा असतांना या सर्व प्रकल्पग्रस्तांना मासिक मानधन अथवा लाईट जॉब मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा अधिकार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.
Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 213 आज आणखी 5 कोरोना बाधित
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 100 113 बाधित कोरोनातून बरे चंद्रपूर,दि. 15 जुलै: जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 213 झाली आहे. यापैकी 113 बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 100 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी 17 जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे 11 जवान व 6 जन अन्य राज्याचे […]
अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन.
चंद्रपूर:- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. सदर योजना ही निव्वळ धूळफेक करणारी असून, वाढलेल्या बेरोजगारी वर पांघरून घालण्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात सैन्य भरती रखडली गेली असल्यामुळे सैन्य भरती करिता सराव करणाऱ्या तरुणांमध्ये मोठ्या […]
कॉन्व्हेंट शिक्षकांचे भजन आंदोलन
2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी पालकांच्या समस्या कडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता भजन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध संघटनांनी आपला पाठिंबा […]


