
चंद्रपूर (का.प्र ):जिल्ह्यात वाढते कोरोना रूग्ण आणि मृत्यूसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात समूह संसर्गाची भिती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून येत्या बुधवार पासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करावा, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज दि.५ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जनता कर्फ्यू संदर्भात केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचे त्यांनी सांगीतले.



