
नाल्याचा प्रवाहात आटो गेला वाहून
जीव वाचविण्यासाठी प्रवाश्यांनी फोडला टाहो
चंद्रपूर : जिह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्या ऑटो मध्ये पाच प्रवाशी होते. मृत्यूला समीप बघून ते मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. मात्र, पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कुणीही त्यांना वाचविण्यासाठी हीमंत केली नाही. अश्यात महीण्याभराचा सूट्टीवर गावाकडं आलेल्या इंडियन आर्मीचे जवान निखिल सुधाकर काळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली. आपला जीव धोक्यात टाकून या जवानाने पाच लोकांचा जीव वाचविला. देश्यासाठी सिमेवर लढणार्या या जवानाने रजेवर असतांनाही आपले कर्तव बजावले.




