जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रम ; उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना सुलभतेने झेंडे उपलब्ध होण्याकरिता ठिकठिकाणी विक्री केंद्र सुरु केले जात आहे. त्याअंतर्गतच आज वर्धा येथे जिल्हास्तरीय झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा माहिती अधिकार मंगेश वरकड उमेदचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हर घर तिरंगा हा उपक्रम दि.13 ते 15 आँगस्ट या तीन दिवसात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 3 लाख 50 हजारावर झेंडे लावण्याचे नियोजन आहे. यात शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, बचतगट, शाळा, महाविद्यालये आदी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे.





