उपमूख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा चंद्रपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना दिक्षा दिली. त्यामूळे चंद्रपूरशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते जूळल्या गेले असून याची ईतिहासातही दखल घेण्यात आली आहे. मात्र त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारे एकही वास्तू चंद्रपूरात नाही. त्यामुळे युवा पिढीला त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची माहिती देणारे संविधानारावर आधारीत अद्यावत संविधान भवन चंद्रपूरात उभारण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ – नियोजन मंत्री अजितदादा पवार यांना दिले आहे.काल मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात आ. जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री अजीतपवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूरात संविधानाच्या माहितीवर आधारीत संविधान भवन निर्मीतीच्या मागणी संदर्भात चर्चा केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली या ठिकाणी बौध्द धम्माची दिक्षा दिली. त्यामुळे येथील पावण दिक्षाभूमीवर भारतासह जगाच्या कानाकोप-यातुन लाखो बौद्ध उपासक – उपासिका, भिक्षू संघ मोठ्या संख्येने येतात परंतु आज इतके वर्ष लोटूनही या दिक्षाभूमीचा अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे याच्या विकासासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची माहिती आणि पर्यायाणे संविधानीक हक्कांबाबत चंद्रपूरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच बाहेरुन येणा-या नागरिकांनाही डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या विषयी जाणून घेणे सहज व्हावे याकरिता चंद्रपूर शहरात संविधानावर आधारित संपूर्ण माहिती असलेले अद्यावत संविधान भवन उभारण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी ना. अजीतदादा पवार यांना केली आहे. तसे पत्रही आ. जोरगेवार यांच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. अजित पवार यांनीही यावेळी आ. जोरगेवार यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या कामाबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून माहिती घेवून सदर मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Related Articles
बल्लारपूर पॅसेंजर मध्ये शार्ट सर्किट,धावती रेल्वे अचानक पडली बंद
जिव वाचविण्यासाठी प्रवाशांची एकच तारांबळ चंद्रपूर : बल्लारपूर पॅसेंजर मध्ये अचानक शार्ट सर्किट झाल्याने धावती रेल्वे अचानक बंद पडली. रेल्वेतील विद्यूत व पंखे बंद झाल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. जिव वाचविण्यासाठी काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. ही घटना आज गुरूवारी सायंकाळी माजरी रेल्वे स्थानकावर घडली. बंद पडलेली रेल्वे माजरी […]
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केली शेतकऱ्याला आर्थिक मदत
शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल मारल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील कांतापेठ येथील शेतकरी राजु वाढई यांना तातडीचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कांतापेठ येथील नुकसानग्रस्त शेतकरी राजु वाढई यांचे घरी जावुन बँकेच्या वतीने आर्थिक मदतीचा […]
ज्युबिलीच्या मैदानावर ‘झुंड’ची प्रचिती
सीईओंचीही साथ कचऱ्याने वेढलेले मैदान खेळाडूंसाठी होणार सुसज्ज चंद्रपूर : जिल्हास्थान असलेल्या चंद्रपुरात अनेक तालुक्यातून युवक पोलीस, सैनिक भरती व इतर परीक्षांच्या तयारीसाठी दरवर्षी येतात. शहरातीलही अनेक युवक तयारी करतात. मात्र, कोरोनाकाळात व त्यानंतर शहरातील बहुतांश क्रीडांगणांवर सरावाची परवानगी मिळाली नसल्याने शेकडो युवकांना रस्त्यावर धावावे लागत होते. परंतु, जनविकास सेनेच्या पुढाकाराने कचऱ्याने वेढलेले ज्युबिली शाळेचे […]



