
चंद्रपूर येथील लॉकडाउन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स. १० ते २ पर्यंत सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र आज पहिल्याच दिवशी जनतेनी मार्केटमध्ये तोबा गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडविला या गर्दीला पाहून जणू काही कोरोनाचे संकट गेले कि काय असेच वाटायला लागले अश्या प्रकारे नियमांचे पालन न करता नागरिक बाजारात गर्दी करत असेल तर कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदतच होईल किंबहुना आपले व इतरांचेही आरोग्य धोक्यात येऊ शकते.



