महाराष्ट्र

गो कोरोनाः राज्यात १३०० कंपन्यांना परवानगी

मुंबई (मवृसे) राज्य सरकारने काही अटी आणि शर्थीच्या आधारे उद्योगांना परवानगी दिली आहे. एमएडीसीकडे जवळपास ३००० कंपन्यांची नोंदणी आहे. त्यापैकी १३०० कंपन्यांना कामकाज पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असल्याचे महामंडळाच्या अधिकाèयाने सांगितले. कारखाने, वस्त्रोद्योग, धातू उद्योग यातील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या पुन्हा सुरु झाल्याने किमान २० हजार कामगारांच्या हाताला आता काम मिळणार आहे. यातील ६० टक्के कामगारांना प्रकल्पांजवळ निवारा दिला जाणार आहे, असे या अधिकाèयाने सांगितले. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून वस्तूंचे उत्पादन सुरु होणार आहे. केंद्र सरकारने टाळेबंदीचा कालावधी दुसèयांदा वाढवला आहे. आता ३ मेपर्यंत देशभर लॉकडाऊन आहे.

मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एकही करोना रुग्ण नाही. अशा ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे अटी आणि शर्थीच्या आधारे सुरु करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार ३ एप्रिल रोजी एमआयडीसी ने परवानगी देणारे पोर्टल कार्यान्वित केले. यात ज्यांना पुन्हा दैनंदिन कामकाज सुरु करायचे आहे, अशा कंपन्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते.एमआयडीसी ने परवानगी देताना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामगारांना पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करावा, अशी अट देखील घालण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास १३५५ कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. १३५५ कंपन्यांपैकी ७५२ कंपन्या या एमआयडीसी मधील आहेत. ४० टक्के कामगार हे ग्रीन झोन किंवा त्या कंपनी जवळ राहणारे आहेत. विशाल उद्योगाना ५० टक्के कामगारांसाठी काम करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती या अधिकाèयाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.