राजुरा(प्रति) :— काल रात्रौ च्या सुमारास गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रा येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली.बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यात रात्रौ ३:००च्या दरम्यान एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्यांने गाडीची स्पीड अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले.पाठलाग केल्यानंतर ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला.पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्या मुळे त्याला थांबावे लागले सिनेस्टाईल पाठलाग करतात बजरंग दलाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली. पण दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.मग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, पोलिस विभागाच्या मदतीने दोन्ही ट्रक ठाण्यात आणण्यात आले.बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता.जीवाला उदार होऊन गौ मातांचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे, पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही, आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा शासनाने केला.पण अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजही रोज गाई ची कत्तल सुरू आहे . शासन व प्रशासन कारवाई न करता डोळे मिटून शांत झोप घेत आहेत.शासनाने या गंभीर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधित गोमाता पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी करीत असुन .पुढील प्रकरणाचा तपास राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.या तपासाअंती त्या गोमाता पळविणाऱ्या टोळीवर व संबंधित ट्रक ड्रायव्हर वर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related Articles
उच्च शिक्षीत होऊन संघटीत व्हा – आ. किशोर जोरगेवार
बिरसा क्रांती दलाच्या वतीने आदिवासी जनसंवाद परिषदेचे आयोजन… आदिवासी समाजाचा ईतिहास शुरवीर आहे. हा सेवेकरी समाज आहे. मात्र दुस-र्यांची सेवा करत असतांना आपण मागे राहिलो. आता याची चिंता व्यक्त करण्यापेक्षा यामागच्या कारणांचे अशा आयोजनाच्या माध्यमातुन चिंतन करा, उच्च शिक्षीत होऊन संघटीत व्हा आणि समाजाच्या न्यायक मागण्यांसाठी संघर्ष करा. यात लोकप्रतिनिधी म्हणुन शेवटच्या क्षणा पर्यंत मी आपल्या […]
चंद्रपूर मनपाच्या डम्पिंग यार्ड मध्ये भीषण आग
चंद्रपूर – चंद्रपूर मनपाच्या अष्टभुजा प्रभागात स्थित डम्पिंग यार्ड मध्ये 9 मे ला भीषण आग लागली. सदर यार्ड मध्ये दररोज शहरातील कचरा संकलन करीत इथे जमा करीत घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. आज सकाळच्या सुमारास कचऱ्यातून धूर निघत होता, त्या धुरीचे रूपांतर आगीत झाल्याने ती आग वाऱ्यासारखी परिसरात पसरली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले, […]
चंद्रपूरात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन
केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना साथरोग नियोजनात अपयश आले आहे. पेट्रोल, डिझेलची दररोज भाववाढ होत आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे अपयशी निर्णय घेतले. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरीविरोधात काळे कायदे करण्यात आले. मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मागील सात वर्षांत देशात काळोखच […]



