ओबीसी समन्वय समिती बल्लारपूरतर्फे ३/३/२३ रोजी ओबीसी जनगणना व्हावी आणि ओबीसीच्या हक्काच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तालुकास्तरावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती त्या मोहीमेचा समापन काल १७/०५/२३ ला करण्यात आले त्यानिमित्य ओबीसी समन्वय समितीद्रवारे बल्लारपूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले त्यामार्फत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचवण्याचे निवेदन केले ओबीसीच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे त्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या.या स्वाक्षरी मोहीमेत बल्लारपूर तसेच ग्रामीण क्षेत्रातील हजारो नागरिकांनी सहभाग दर्शवला त्यात ओबीसी समन्वय समितीचे सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी मोहिमेला यशस्वी केले निवेदन व संकलित स्वाक्षरी चे निवेदन पोस्ट मार्फत गृहमंत्री यांना प्रेषित करण्यात आले.यावेळी ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष विवेक खुटेमाटे मनोहर माळेकर , सुधीर कोरडे, उमेश कडू, संजय वटाणे सूर्यकांत साळवे, अमोल काकडे, शंकर काळे, राजेश बट्टे, शुभांगी तिडके तसेच ओबीसी समन्वय समितीचे मार्गदर्शक सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




