
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातून आष्टी-गोंडपिपरी कडे जाणारा मार्ग दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही नुकतेच कॅप्सूल ट्रकच्या अपघातात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आज सायंकाळी 7:00 वा बल्लारपूर तालुक्यातील कोर्टी मक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड वय-27 युवकाचा कळमना जवळ ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली विशेष म्हणजे सदर युवक अविवाहित होता या अपघाताचे वृत्त गावकऱ्यांना कळताच स्थानिक नागरिकांनी बल्लारपूर ते गोंडपिपरी रस्ता अडवून सायंकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत चक्का जाम आंदोलन केले. तदनंतर बल्लारपूर पोलिस व प्रशासनाच्या हस्तक्षेप व मध्यस्थी नंतर सदर मार्ग वाहतुकीसाठी मोकळा कऱण्यात आला. सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे सुरु आहे .




