चंद्रपूर शहरातील संचारबंदी शिथिल झाल्यासारखी वाटत असताना पोलिसांनी अचानक नाकाबंदी करत वाहन धारकांना धक्का दिला. शहराच्या मध्यवर्ती आझाद बाग चौक, जटपुरा गेट येथे सुरू करण्यात आलेल्या नाकाबंदीत स्वतः अधिकारी सहभागी झाले. या दरम्यान विनाकारण संचारबंदी मोडणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली.




