चंद्रपुर

चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गुरुवार पासून जनता कर्फ्यू ची घोषणा

चंद्रपूर (का.प्र):- चंद्रपूर शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे हा निर्णय व्यापारी व जनप्रतिनिधीं यांच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.सराफा व्यापाऱ्यांनी 9 सप्टेंबर पासून 16 सप्टेंबर पर्यन्त कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.जिल्ह्यात वाढते कोरोना बाधित बघता प्रशासनाने 4 दिवसांचा जनता कर्फ्यु करणार असल्याचे आज जाहीर केले.हा जनता कर्फ्यु चंद्रपूर व बल्लारपूर शहरासाठी लागू असेल दोन्ही शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय करण्यात आला आहे.यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व शासकीय कार्यालये वगळता बाकी सर्व बंद दुकाने असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.