चंद्रपूर (का.प्र):- चंद्रपूर शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे हा निर्णय व्यापारी व जनप्रतिनिधीं यांच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.सराफा व्यापाऱ्यांनी 9 सप्टेंबर पासून 16 सप्टेंबर पर्यन्त कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.जिल्ह्यात वाढते कोरोना बाधित बघता प्रशासनाने 4 दिवसांचा जनता कर्फ्यु करणार असल्याचे आज जाहीर केले.हा जनता कर्फ्यु चंद्रपूर व बल्लारपूर शहरासाठी लागू असेल दोन्ही शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय करण्यात आला आहे.यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व शासकीय कार्यालये वगळता बाकी सर्व बंद दुकाने असणार आहे.
Related Articles
मनपातर्फे राबविण्यात येणार ‘ मेरी मिट्टी मेरा देश ‘ अभियान
मातीचे दिवे व माती हातात घेऊन करा सेल्फी अपलोड चंद्रपूर – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘ मेरी मिट्टी मेरा देश अभियान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. सदरउपक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आढावा बैठक २ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात मृत्यु शुन्यावर तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी 24 तासात 13 कोरोनामुक्त, 11 पॉझिटिव्ह चंद्रपूर,दि. 6 जुलै : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्युची संख्या शुन्यावर आली असून ॲक्टीव्ह रुग्णसंख्यासुध्दा प्रचंड कमी झाली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 11 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात […]
गडचांदूर येथे होणार रेल्वेचा मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल
गडचांदूर – भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील गडचांदूर रेल्वे स्थानकावर गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल विकसित करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. १५.२० कोटी रुपये खर्चून सदर टर्मिनल बांधण्यात येणार असून यामुळे गडचांदूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. सदर बांधकामाचे टेंडर स्थानिक दालमिया भारत कंपनीला मिळाल्याने लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद […]



