राजुरा(प्रति) :— काल रात्रौ च्या सुमारास गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रा येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली.बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यात रात्रौ ३:००च्या दरम्यान एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्यांने गाडीची स्पीड अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले.पाठलाग केल्यानंतर ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला.पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्या मुळे त्याला थांबावे लागले सिनेस्टाईल पाठलाग करतात बजरंग दलाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली. पण दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.मग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, पोलिस विभागाच्या मदतीने दोन्ही ट्रक ठाण्यात आणण्यात आले.बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता.जीवाला उदार होऊन गौ मातांचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे, पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही, आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा शासनाने केला.पण अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजही रोज गाई ची कत्तल सुरू आहे . शासन व प्रशासन कारवाई न करता डोळे मिटून शांत झोप घेत आहेत.शासनाने या गंभीर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधित गोमाता पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी करीत असुन .पुढील प्रकरणाचा तपास राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.या तपासाअंती त्या गोमाता पळविणाऱ्या टोळीवर व संबंधित ट्रक ड्रायव्हर वर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related Articles
पडोली मार्गावर भीषण अपघात….
चंद्रपूर/पडोली – शहरात दुपारच्या सुमारास पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुटाळा गावाजवळ भीषण अपघाताने संपूर्ण पडोली परिसर हादरून गेला. भीषण अपघातात गर्भवती महिला व 3 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. 27 वर्षीय नम्रता निखिल टावरी ही आपल्या पतीसोबत दवाखान्यात तपासणी करण्यासाठी निघाले त्यांच्या सोबत 5 वर्षीय मुलगी कनक टावरी व 3 वर्षीय लक्ष हे […]
*जिल्ह्यातील आरोग्य सेवा अद्ययावत करा* : *संतोष सिंह रावत*
मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली असून शेतकरी, कामगार, महिला व बालकांना आरोग्य केंद्रात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात साधन व सुविधांची वाणवा आहे. वाढत्या नवनवीन आजारांच्या तुलनेत आरोग्य केंद्रे अद्ययावत नाहीत. तेव्हा जिल्हा प्रशासनाने ताबडतोब जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी सर्व आरोग्य केंद्रात मूलभूत […]
‘चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी’
खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकसंवेदना चंद्रपूर,दि.३०: चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व […]



