
चंद्रपूर (का.प्र.)मध्यरात्री आलेल्या वादळी पावसामूळे अनेक घरांचे मोठे नूकसान झाले आहे. या पावसामूळे अनेकांच्या घराचे कवेलू व टिनपत्रे उडले आहेत. तसेच या पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून असल्याने तो ओला झाल्याची भिती आहे. त्यामूळे प्रशासनाने वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. नागरिक कोरोना विषाणूशी लढत असतांना आता नियतीचा प्रकोपही त्याला झेलावा लागत आहे. काल मध्यरात्री चंद्रपूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली, रात्री २ वाजता पासून वादळाला सुरुवात झाली. त्यानंतर तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी ९ वाजेपयत पावसाचा कहर सुरु होता.
सकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर झालेले नुकसान समोर आले. या पासवसामूळे अनेकांच्या झोपड्या शतीग्रस्त झाल्या आहे. तसेच घरावरचे टिनपत्रे उडाल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कवेलूंच्या घरांनाही या वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. वादळाच्या वेगामूळे घरावरची कवेलू खाली कोसळून पडल्याने अनेकांचे आर्थिक नूकसान झाले आहे. विशेष म्हणजे भिवापूर, बाबूपेठ, कामगार वस्ती, महाविर नगर, इंदिरानगर, पडोली या भागातील नागरिकांचे या वादळी पावसामूळे मोठे नूकसान झाले आहे. तसेच या पावसाचा फटका शेतकèयांनाही बसला आहे. अनेकांच्या शेतातील आंब्यांचे नूकसान आहे. तर सिसिआय अंतर्गत कापूस खरेदी बंद असल्यामूळे अनेक शेतकèयांचा कापूस घरीच पडला होता. त्यामूळे शेतकèयांचा कापूस ओला झाल्याची शक्यता आहे. एकीकडे कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशात त्यांना आता या वादळी पावसामूळे चांगलाच फटका बसला आहे. त्यामूळे आता महसुल विभागाने तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.



