चंद्रपूर (का.प्र.) : स्थानिक नियोजन भवन येथे आज दुपारी १२. ३० च्या सुमारास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पार पडली.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या ग्रामसभा घेण्याचा मोठा निर्णय घेतला.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा रखडल्यामुळे गावांचा विकास खोळंबला आहे. आणि गावांचा विकास खोळंबु नये म्हणून सुरक्षित अंतर पाळून व नियमांचे पालन करून ग्रामसभा घेण्यात याव्या असे निर्देशहि त्यांनी दिले.




